निवडणुकीत पैसे वाटून मत मिळविली जातात. निवडणुकी च्या तोंडावर नेते लोक देणग्या देत फिरतात. म्हणजे फक्त पैशे वाले श्रीमंत च निवडणूक जिंकू शकतात. मग गरिबांनी निवडणुका जिंकायच्या नाहीत का ? ही लोकशाही गरीब लोकांसाठी नाही काय? येणाऱ्या काळात निवडणूक काळात देणग्या, पैशे, पार्ट्या वाटल्या जाणार नाहीत याची हमी भाजप कॉंग्रेस इ कोणताही पक्ष आमदार खासदार देऊ शकतो का?
आबू बाबू शिक्षक च्या नोकरी मिळण्यासाठी 15-20 लाख donation रक्कम मागितली जाते. इतके पैसे गरीब लोकांकडे असतात का? मग गरिबांच्या मुलांनी नौकरी करू नये काय? मग ही लोकशाही कोणासाठी आहे?
अन्याय झाल्यास कोर्टात जाण्यासाठी, वकिलाची फी द्यावी लागते. गरीबांकडे कोर्ट केस लढण्यासाठी, वकिलाला देण्यासाठी पैसे असतात काय? गरिबांना न्याय मिळण्याचा हक्क नाही काय? कोर्टात गेल्यावर लगेच न्याय मिळतो काय? लगेच न्याय मिळण्याचा आपल्याला हक्क नाही का? कोर्ट मध्ये गेल्यावर लगेच न्याय मिळेल, गरिबांना ही न्याय मिळेल, कोर्ट मधून सत्याचाच विजय होईल याची हमी कोणता पक्ष, कोणता नेता देऊ शकतो?
पोलीस आरोपी कडून पैसे घेऊन साक्षी पुरावे आरोपपत्र बदलतात, गुंड चोर उचक्के कोर्टातून मोकाट सुटतात. झक मारून सर्वसामान्यांना चोर गुंडांनाच मान सम्मान द्यावा लागतो. ज्याच्यावर अन्याय झाला त्या फिर्यादीला पैशासाठी पोलीस छळतात, त्यालाच निमूटपणे अन्याय सहन करावा लागतो. दोष नसताना पोलीस कायद्याचा दुरुपयोग करून निरपराध नागरिकांकडून पैसे लुटतात. पोलीस खोटे काम करणारच नाहीत, पैसे लुबाडणार नाहीत याची हमी कोणता पक्ष, नेता देऊ शकतो का?
ग्रामविश्व संघर्ष वाहिनी ही दीन दुबळ्या साठी संघर्ष करणाऱ्या संघर्ष वाहिनी या संघटनेची शाखा म्हणून कार्यरत झाली आहे. गाव हाच विश्वाचा पाया, गावातील प्रश्न गावात, गावातला न्याय गावात, गावातला पैसा गावात या थीम वर ही चळवळ उभी केली जाणार आहे.
कार्यक्रमात सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती वर व्हिडीओ दाखविण्यात आला. ग्रामविश्व संघर्ष वाहिनी ही सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती तंत्राची कट्टर पुरस्कर्ती आहे.
कार्यक्रम च्या आयोजन साठी सर्वश्री हरिदास मोहिणकर आणि टीम, मनोज दिघोरे, नेहरू खेडकर, लक्ष्मण भानारकर, काकाजी दिघोरे, आनंद हरी भानारकर आणि इतरही बऱ्याच कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली
निवडणुकीत पैसे वाटून मत मिळविली जातात. निवडणुकी च्या तोंडावर नेते लोक देणग्या देत फिरतात. म्हणजे फक्त पैशे वाले श्रीमंत च निवडणूक जिंकू शकतात. मग गरिबांनी निवडणुका जिंकायच्या नाहीत का ? ही लोकशाही गरीब लोकांसाठी नाही काय? येणाऱ्या काळात निवडणूक काळात देणग्या, पैशे, पार्ट्या वाटल्या जाणार नाहीत याची हमी भाजप कॉंग्रेस इ कोणताही पक्ष आमदार खासदार देऊ शकतो का?
आबू बाबू शिक्षक च्या नोकरी मिळण्यासाठी 15-20 लाख donation रक्कम मागितली जाते. इतके पैसे गरीब लोकांकडे असतात का? मग गरिबांच्या मुलांनी नौकरी करू नये काय? मग ही लोकशाही कोणासाठी आहे?
अन्याय झाल्यास कोर्टात जाण्यासाठी, वकिलाची फी द्यावी लागते. गरीबांकडे कोर्ट केस लढण्यासाठी, वकिलाला देण्यासाठी पैसे असतात काय? गरिबांना न्याय मिळण्याचा हक्क नाही काय? कोर्टात गेल्यावर लगेच न्याय मिळतो काय? लगेच न्याय मिळण्याचा आपल्याला हक्क नाही का? कोर्ट मध्ये गेल्यावर लगेच न्याय मिळेल, गरिबांना ही न्याय मिळेल, कोर्ट मधून सत्याचाच विजय होईल याची हमी कोणता पक्ष, कोणता नेता देऊ शकतो?
पोलीस आरोपी कडून पैसे घेऊन साक्षी पुरावे आरोपपत्र बदलतात, गुंड चोर उचक्के कोर्टातून मोकाट सुटतात. झक मारून सर्वसामान्यांना चोर गुंडांनाच मान सम्मान द्यावा लागतो. ज्याच्यावर अन्याय झाला त्या फिर्यादीला पैशासाठी पोलीस छळतात, त्यालाच निमूटपणे अन्याय सहन करावा लागतो. दोष नसताना पोलीस कायद्याचा दुरुपयोग करून निरपराध नागरिकांकडून पैसे लुटतात. पोलीस खोटे काम करणारच नाहीत, पैसे लुबाडणार नाहीत याची हमी कोणता पक्ष, नेता देऊ शकतो का?
शासकीय अधिकारी पैशासाठी कामचुकार पणा करतात, त्रास देतात. पैसे लाच लुचपत हाच त्यांना जन्म सिध्द अधिकार वाटतो. ठेकेदाराला हेलपाटे मारायला लावतात. ठेकेदार, बिल्डर, लेआऊट वाले कडून लाच लुचपत घेतल्याशिवाय काम करीत नाहीत. स्थानिक नेते, आमदार, खासदार यांचे ही कमिशन ठरले असते. माहीत असूनही सर्वसामान्य लोक काहीच करू शकत नाहीत??. यानंतर ही असे होणारच नाही याची हमी कोणता पक्ष व नेता देऊ शकतो?
हे सर्व फिक्स करण्यासाठी कोणाकडे योजना तरी आहेत का?
नवीन विचार, नवीन दिशा...
जॉईन करा…
ग्रामस्वराज संघर्ष वाहिनी
ग्रामगीतेतील ग्रामराज्य संकल्पनाच भारताला तारु शकते.
गरीब आणि वंचित समाजला न्याय देणारी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेली लोकशाही व्यवस्था भारतात अजूनपर्यंत प्रस्थापित होऊ शकली नाही. त्यामुळे भारतात एक नवीन क्रांती ची चळवळ आवश्यक आहे. भिसी ता चिमूर येथे ग्रामविश्व संघटनेची स्थापना करण्यात आली. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या ग्रामराज्य आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीता या संकल्पने वर आधारित लोकशाही व्यवस्था भारताला तारु शकते. त्याशिवाय भारताला पर्याय नाही. असे प्रतिपादन श्री गजेंद्र दि चाचरकर यांनी उद्घाटनप्रसंगी केले.
माजी राज्यमंत्री डॉ रमेशकुमार गजभे, आंबेडकरी चळवळीचे पुरस्कर्ते श्री सिद्धार्थ चहांदे, मच्छिमार सोसायटी अध्यक्ष वसंता शिवरकर, जेष्ट नाटककार आनंद भिमटे, शामरावजी नागपुरे, भिमानंद भिमटे, घनश्याम जी डुकरे, प्रकाश रोकडे, रवींद्र ढोणे, डॉ दिलीप राऊत, मेहर गुरुजी आणि ग्रामविश्व चळवळीचे संस्थापक, संयोजक गजेंद्र दि चाचरकर, आणि इतरही बरीच मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते.
भारतात भ्रष्टाचार, लाच लुचपत प्रचंड बोकाळलेली आहे. याला एक्के दूक्के कोणी मंत्री, आमदार खासदार, अधिकारी, कोणी एक यंत्रणा कारणीभूत नसून संयुक्त पणे पूर्ण व्यवस्था कारणीभूत आहे. ग्रामविश्व ही चळवळ कोण्या एका विशिष्ट माणसा विरुद्ध नसून पूर्ण व्यवस्थे विरुद्ध आहे. असा उल्लेख ग्रामविश्व चे संयोजक गजेंद्र दि चाचरकर यांनी केला.
भारतातील प्रस्थापित पक्षांनाही न सुटणारे कोणते प्रॉब्लेम्स आहेत आणि त्यावरील उपाय काय याची संक्षिप्त माहिती असलेले पॉम्प्लेट उपस्थित कार्यकर्त्यांना वाटण्यात आली.
ग्रामविश्व संघर्ष वाहिनी ही दीन दुबळ्या साठी संघर्ष करणाऱ्या संघर्ष वाहिनी या संघटनेची शाखा म्हणून कार्यरत झाली आहे. गाव हाच विश्वाचा पाया, गावातील प्रश्न गावात, गावातला न्याय गावात, गावातला पैसा गावात या थीम वर ही चळवळ उभी केली जाणार आहे.
कार्यक्रमात सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती वर व्हिडीओ दाखविण्यात आला. ग्रामविश्व संघर्ष वाहिनी ही सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती तंत्राची कट्टर पुरस्कर्ती आहे.
कार्यक्रम च्या आयोजन साठी सर्वश्री हरिदास मोहिणकर आणि टीम, मनोज दिघोरे, नेहरू खेडकर, लक्ष्मण भानारकर, काकाजी दिघोरे, आनंद हरी भानारकर आणि इतरही बऱ्याच कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली.